-
लॉकडाऊनचे चार महिने आणि घटनादत्त जबाबदारी

२३ जुलै रोजी कोव्हिडं-१९ मुळे केल्या गेलेल्या लॉक डाऊनला तब्बल चार महिने झाले आहेत. हा चार महिन्याचा कालखंड भारतासह जगाच्या इतिहासात एक अभूतपूर्व वेगळेपणा घेऊन आला. अशा काळातून आपल्याला जावे लागेल याची किंचितही कल्पना आजच्याच नव्हे तर मागच्या ही काही पिढ्यांनी केली नव्हती. आज जगामध्ये कोरोना विषाणूने बाधित झालेल्यांची संख्या दीड कोटींवर पोहोचली आहे. भारतामध्ये…
-
ग्रंथालय, ग्रंथालय सेवक आणि कोरोना

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) कोव्हिडं – १९ च्या कोरोना विषाणूचे थैमान जगभर सुरू आहे.त्यामुळे अनेक क्षेत्रांची वाताहत सुरू आहे.आर्थिक क्षेत्रांची वाताहत तर आहेच आहे.त्याच बरोबर सांस्कृतिक क्षेत्रांचीही वाताहत सुरू आहे.त्यातीलच एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालये.ही ग्रंथालये मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यापासून लॉक डाऊनमुळे गेले चार महिने बंदच आहेत. महाराष्ट्रातील…
-
प्रा.डॉ.एन.डी.पाटील: उपेक्षितांचा पहाडी आधारवड

महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत नेते आणि समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व विद्यमान अध्यक्ष प्रा.एन.डी. पाटील बुधवार ता. १५ जुलै २०२० रोजी ब्यांणव्या वर्षात पदार्पण करत आहेत. यानिमित्ताने त्यांनी लिहिलेली ” शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? “आणि “शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ? “या दोन पुस्तकांच्या नव्या आवृत्ती प्रकाशित होत आहेत. ब्यांणाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने एन.डी.सरांना भरभरून…
-
इंधन भाववाढ : पिचलेल्या समान्यांची लूट

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) गेल्या तीन आठवड्यात ज्या पद्धतीने इंधन दरवाढ होत आहे आणि सर्वसामान्य जनतेतून जो रोष व्यक्त केला जात आहे ते केंद्र सरकारच्या अत्यंत बेजबाबदार आणि लबाड कारभाराचे द्योतक आहे. सर्व विरोधी राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य जनता इंधन दरवाढीविरोधात आक्रोश करते आहे पण सरकार त्याविरोधात ब्रही काढत नाही. काँग्रेसने…
-
राजर्षी शाहू महाराज : सामाजिक न्यायाचे कृतिशील पुरस्कर्ते

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५० ८३ ०२ ९०) शुक्रवार ता.२६ जून २०२० हा लोकराजे छत्रपती शाहूमहाराजांचा १४६ वा जन्मदिन.युगकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर आपल्या कार्याचा आणि विचारांचा ठसा पुढील अनेक पिढ्यांवर आजतागायत जे उमटवत राहिले आहेत त्यात लोकराजे शाहू महाराज यांचे नाव घ्यावे लागेल.सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेला अग्रक्रम देणारे ते जाणते राजे होते.’एक वेळ गादी…
-
जात्यंध मानसिकता आम्ही कधी सोडणार?
आपला देश स्वतंत्र होऊन सात दशके उलटून गेल्यानंतरही आज समाजाची वाटचाल जातीअंता ऐवजी जातीच्या सक्षमीकरणाकडे होताना दिसते आहे. आपली राजकीय दुकानदारी चालू ठेवण्यासाठी विविध पक्ष ,संघटना जात जाणिवा बळकट करण्याची कारस्थाने करत असतात.यासाठी समाजाला वेठीला धरतात. हे हानिकारक आहे. या पार्श्वभूमीवर जातीअंताचा विचार फार महत्त्वाचा ठरतो…
-
संत कबीर

शुक्रवार ता.५ जून रोजी संत कबीर जयंती आहे. संत कबीर यांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे. आजच्या बिघडलेल्या ( बिघडवलेल्या ) परिस्थितीत माणूस व माणुसकी दोन्हीही ढासळत चालली आहेत .त्यातून सावरण्यासाठी संत विचारांकडे डोळस भूमिकेतून पाहिले पाहिजे. ‘कबीर विचार ‘हा त्यातील एक महत्त्वाचा विचार आहे. त्यामुळे कबीर जयंतीचे औचित्य साधून कबीर आणि कबीर विचार …
-
विकासदर शून्याखाली, गरिबांना कोण वाली ?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) शुक्रवार ता. २२ मे रोजी रिझर्व बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी रेपो आणि रिव्हर्स दरामध्ये कपातीची घोषणा करतानाच भारताचा आर्थिक विकासदर प्रथमच शून्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली. त्यांनी हेही स्पष्ट केले की, कोरोना संकटाच्या आधीपासूनच भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसू लागला होता.…
-
फसलेले आर्थिक धोरण आणि महाफसवे पॅकेज

आज संपूर्ण समाजव्यवस्थेचे नियंत्रण अर्थव्यवस्थेकडे गेले आहे.त्यामुळे राजकारणाचे अराजकीयीकरण ,संस्कृतीचे बाजारीकरण, शिक्षणाचे व्यापारीकरण ,माणसाचे वस्तूकरण, सामाजिकतेचे असामाजीकरण, कुटुंबव्यवस्थेचे दुभंगीकरण, व्यवस्थेचे कंगालीकरण ,सुदृढतेचे विकलांगिकरण आणि मोकळ्या श्वासाचे कोरोनीकरण अत्यंत वेगाने सुरू आहे.सरकारी अर्थनीती फसलेली आहे यात शंका नाही..
