कॅटेगरी: Opinion
-
उद्धवा ! सजग असो सरकार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल २४ ऑक्टोबर २०१९ रोजी जाहीर झाले होते.पस्तीस दिवसांच्या महामंथनासम गदारोळानंतर शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि काही अन्य छोटे पक्ष व कांहीं अपक्ष यांचे अर्थात ‘महाराष्ट्र विकास आघाडीचे ‘ सरकार स्थापन झाले आहे.शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राचे एकोणतीसावे मुख्यमंत्री…
-
नेहरू मॉडेलची अपरिहार्यता

भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांचा गुरुवार ता.१४ नोव्हेम्बर २०१९ रोजी १३० वा जन्मदिन आहे.त्यानिमित्त त्यांच्या विचारधारे विषयी…
-
न्या.शरद बोबडे आणि अभिव्यक्ती

भारताचे ४७ वे नियोजित सरन्यायाधीश न्या.शरद बोबडे यांनी माध्यमांना बुधवार ता.३० ऑक्टोबर २०१९ रोजी दिलेल्या मुलाखतीत आज सर्वाधिक महत्वाचा ठरलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न अधोरेखित केला हे अनेक अर्थानी महत्वाचे आहे.कारण कलम १९ अंतर्गत येणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यच आज संकुचित होताना दिसते आहे…
-
विधानसभा निवडणूक निकालांचा अन्वयार्थ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५० ८३ ०२ ९०) महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे आणि दोन लोकसभा व सतरा राज्यांतील एकावन्न विधानसभा पोटनिवडणूकांचे निकाल धनत्रयोदशीच्या पूर्वदिनी स्पष्ट झाले.दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होत असते.हा दिवस आरोग्याचा देव आणि आद्य वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो.निवडणुकीच्या निकालात मतदारांनी वैद्याची भूमिका घेत महाराष्ट्राचे राजकीय रोगनिदान केले.आपण…
-
मत ‘दान’ नको – ‘मताधिकार’ बजावूया

मताधिकार म्हणजे सरकार कसे असावे या संबंधी लोकांनी आपल्या मताद्वारे प्रतिनिधींची निवड करण्यासाठी व्यक्त केलेली इच्छा, अशी इच्छा व्यक्त करणारा नागरीक म्हणजे मतदार. लोकशाही व लोकांची सार्वभौम सत्ता या आपल्या राष्ट्राच्या पायाभूत संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे एक महत्वाचे साधन म्हणून आपण मताच्या अधिकाराकडे पाहिले पाहिजे. हा मताधिकार बजावताना आपण जेवढे जागरूक, जाणकार, दूरदृष्टीचे, तात्पुरत्या मोहाला बळी…
-
मंदीच्या जात्यात रोजगारी भरडतेय

चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आणि अनाकलनीय मनमानी निर्णयांमुळे भारतात भयावह आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे.लाखोंच्या संख्येने लहान मोठे धंदे बंद पडणे,करोडो लोक बेरोजगार होणे,विकास दर खालावणे,रुपया घसरणे,रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीतील तब्बल पावणे दोन लाख कोटी रुपये सरकारला वापरायला घ्यावे लागणे ही सारी लक्षणे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दुर्दशेची आहेत.त्याकडे धोरणकर्त्यानी डोळेझाक करणे म्हणजे सर्वसामान्य जनतेला जगण्याच्या हक्कापासूनच वंचित…
-
माहिती अधिकार दुरुस्ती विधेयक :पारदर्शकतेला तडा

माहितीचा अधिकार चिरंजीवी विकासासाठी आणि प्रशासनातील पारदर्शकतेसाठी अतिशय महत्वाचा ठरत असतो.लोकशाही आणि लोकांचे सार्वभौमत्व या संकल्पनांना नवभारताच्या उभारणीत अनन्य साधारण महत्व आहे.त्या संकल्पनांना या कायद्यामुळे बळकटी प्राप्त होते.असे असताना माहितीच्या अधिकारात केंद्र सरकारला हस्तक्षेप करता येईल अशा दुरुस्त्या करणे म्हणजे पारदर्शकतेला बगल देणे आहे…
-
अर्थसंकल्प २०१९-२० : रुपयाची वास्तवता, आणि डॉलरच्या चर्चेचे भ्रमजाल

प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी ( ९८ ५०८ ३०२९०) पूर्ण बहुमताने सत्तेत आलेल्या केंद्र सरकारचा २०१९-२० चा अर्थसंकल्प उच्चविद्याविभूषित असलेल्या आणि देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री असलेल्या मा.निर्मला सीतारामन यांनी संसदेत शुक्रवार ता.५ जुलै रोजी सादर केला.२७ लाख ८६ हजार कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प मा.अर्थमंत्र्यांनी सव्वा दोन तास सलग भाषण करून मांडला.त्यांनी ‘गाव,गरीब आणि शेतकरी ‘ ही त्रिसूत्री…
-
महिला धोरणाचा रौप्यमहोत्सव

मा.शरद पवार मुख्यमंत्री असतांना २२जून १९९४ रोजी ‘महाराष्ट्र सरकारचे महिला विषयक धोरण ‘जाहीर झाले होते. काही सकारात्मक पाऊले टाकणाऱ्या या धोरणाचे महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकीय -सामाजिक सह सर्व क्षेत्रात महत्वपूर्ण स्थान आहे.या धोरणाला शनिवार ता.२२ जून २०१९ रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत.त्या निमित्ताने..
-
पत्रकार कनोजिया यांच्या मुक्तता आदेशाचे महत्व
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८५०८ ३०२९० ) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयसिंह बिष्ट उर्फ योगी आदित्यनाथ यांच्यावर समाजमाध्यमातून आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने पत्रकार प्रशांत कनोजिया यांना अटक केली होती.ही अटक चुकीची असून त्यांची तातडीने मुक्तता करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या न्या.इंदिरा बॅनर्जी व न्या.अजय रस्तोगी यांनी मंगळवार ता.११ जून २०१९ रोजी दिले. हे आदेश…