वर्ष: वाय
-
कंगनाचा बेतालपणा आणि पाठीराख्यांची कृतघ्नता

नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केली गेलेली अभिनेत्री कंगना राणावत हिने टाइम्स नाऊ चॅनेलच्या कार्यक्रमात भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले आहे आणि खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळालेले आहे असे मेंदू गहाण टाकणारे वक्तव्य केले.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात असे विषारी वक्तव्य करून तिने भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या व सहभाग घेतलेल्या लाखो स्वातंत्र्यविरांचा अपमान केला आहे.तसेच पंडित नेहरू…
-
विटेवर गझलेचे रसग्रहण
नमस्कार,काव्यप्रेमी शिक्षक मंच आणि काव्यप्रेमी गझल यांच्या ‘गझलगंध ‘ उपक्रमात मा.रामहरी पंडित ( कारंजा जि.वाशीम ) यांनी बुधवार ता. १० नोव्हेम्बर २१ रोजी सादर केलेले माझ्या गझलेचे केलेले रसग्रहण.गझलगंध उपक्रमास भरभरून शुभेच्छा आणि मा.रामहरी पंडित यांना मनःपूर्वक धन्यवाद..! आपण रसग्रहण जरूर वाचावे ही विनंती. विटेवर ———नाही कधीच झाले माझे इथे कलेवरमृत्यू निवांत झोपे माझ्या जरी…
-
पंडित नेहरू: आत्मनिर्भरतेचे प्रणेते

रविवार ता.१४ नोव्हेंम्बर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन आहे.अलीकडे आत्मनिर्भर शब्द फार चर्चेत आहे.त्याचे प्रणेते आणि कृतीशील धोरणकर्ते नेहरुच होते.त्यांची आत्मनिर्भरता उभारणीवर आधारित होती.विकून खाणारी वाटोळी परनिर्भरता नव्हती.कारखाने,उद्योग हीच खरी राष्ट्रीय मंदिरे ‘ ही त्यांची भूमिका ही आत्मनिर्भरतेची सर्वोत्तम व्याख्या होती व आहे. ते आत्मनिर्भरतेचे प्रणेते होते. भारताच्या इतिहासाचा शोध घेऊन भविष्याची दिशा देण्याचे…
-
सामान्यांचा काळ ठरलेल्या मनमानी निर्णयाचा स्मृतीदिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) ८ नोव्हेंबर २०२१ रोजी नोटाबंदीच्या अर्थात पाचशे व एक हजार चलनातील नोटा बंद करण्याचा अत्यंत अविचारी,अविवेकी, मनमानी निर्णयाचा पाचवा स्मृतिदिन होता.हा निर्णय चुकीचा होता हे देशाच्या सर्वांगीण अवस्थेवरून आणि करोडो सर्वसामान्य माणसांच्या कंबरडे मोडण्यातून स्पष्टच झाले आहे. हे सत्ताधाऱ्यांनाही पटले आहेच पण ते मूग गिळून गप्प आहेत. उत्सवप्रिय व इव्हेंटबाज…
-
दिवाळी अंक ,मनोरंजन व मनपोषण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) गेल्या दोन वर्षात निर्माण झालेले कोरोनी वातावरण काही प्रमाणात आता बदलू लागले आहे.अर्थात कोरोनाचे संकट टळलेले नाहीच. पण कोरोनासह सर्वच प्रकारच्या सामाजिक,आर्थिक,राजकीय,सांस्कृतिक संकटांवर मात करायची असेल तर विचार समृद्धता ही महत्त्वाची बाब आहे. आणि विचार देण्याचे एक महत्त्वाचे मराठी सांस्कृतिक वैशिष्ट्य म्हणून दिवाळी अंकांकडे पहावे लागेल.या वर्षीही बाजारात अनेक दिवाळी…
-
बोलघेवडी आत्मनिर्भरता आणि देशाच दिवाळ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) २० ऑक्टोबर २०२१ रोजी मा. पंतप्रधानांनी तेल ,गॅस, नैसर्गिक तेल व वायू या क्षेत्रातील विशेष तज्ज्ञांशी चर्चा केली. स्वच्छ विकास तसेच स्थैर्याला प्रोत्साहन देणे हा या बैठकीचा मुख्य विषय होता असे सांगण्यात आले.त्यामध्ये मा. पंतप्रधान इंधनदरवाढी विरोधात शाश्वत उपायांवर भर देणार असल्याचे म्हणाले. तसेच भारताला तेल आणि वायू क्षेत्रात ‘…
-
शतकोटी लसोत्सव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) गुरुवार ता. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी भारताने शंभर कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा टप्पा पार केला.ही अतिशय आनंदाची बाब आहे. यामध्ये योगदान देणाऱ्या लस निर्मिती कंपन्यांबरोबरच ,आरोग्य सेवक आणि लस धोरणात पूर्णतः गोंधळलेल्या केंद्र सरकारला खडसावत लस धोरणाचे नवे सूत्र जाहीर करण्यास भाग पाडणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च योगदान आहे.…
-
श्रीमंत गोविंदराव घोरपडे यांचा तिसरा स्मृतीदिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८५०८३०२९०) शनिवार ता.१६ ऑक्टोबर २०२१ रोजी इचलकरंजी संस्थानचे जहागीरदार श्रीमंत आबासाहेब उर्फ गोविंदराव घोरपडे यांचा तिसरा स्मृतिदिन आहे.इचलकरंजीच्या या अधीपतींनी लोकसेवेचे प्रसिद्धीपासून दूर राहून वर्षानुवर्षे जे काम केले ते अतुलनीय स्वरूपाचे आहे.आज लोकसेवेचाे तोच वसा वारसा श्रीमंत आबासाहेब यांचे चिरंजीव श्रीमंत यशवंतराव घोरपडे पुढे अधिक ताकदीने नेत आहेत ही फार महत्वाची…
-
डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम व वाचन प्रेरणा दिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) भारताचे माजी राष्ट्रपती,महान शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा शुक्रवार ता. १५ ऑक्टोबर २०२१ रोजी नव्वदावा जन्मदिन आहे. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘ वाचन प्रेरणा दिन ‘म्हणून साजरा केला जातो. नव्या पिढीमध्ये व खासकरून विद्यार्थी वर्गामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यातून वाचनातूनच घडलेल्या डॉ.…
-
ते सहा तास ‘ मार्गावर येण्यासाठी उपयुक्त ठरोत

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) सोमवार ता. ४ ऑक्टोबर २०२१रात्री साडेनऊनंतर अचानक जगभरचे फेसबुक, व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम बंद पडले.ते सहा तासांनी सुरू झाले.पण ते सहा तास जगभर एकच हाहाकार माजला. जगातील एक आघाडीचे सोशल नेटवर्किंग संकेत स्थळ काही तास बंद झाले तर काय होऊ शकते याचे दर्शन या काळात झाले. यांत्रिक…