कॅटेगरी: Uncategorized
-
निवडणूक आयोगाने आब राखावा

प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीतील अखेरचा टप्पा पार पडल्यावर ४ जूनला या निवडणुकीच्या कौल स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए युती आणि विरोधक इंडिया आघाडी यांच्याप्रमाणे यावेळी निवडणूक आयोगही मोठ्या प्रमाणात लोकचर्चेत राहिला.शंभर कोटीवर मतदार संख्या असलेला आणि त्यापैकी पासष्ट-सत्तर कोटी लोक आपला मताधिकार बजावणारा भारत हा जगातील एक मोठा संसदीय लोकशाही असलेला…
-
पद्मभूषण काझी नजरूल इस्लाम यांचा १२५ जन्मदिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com थोर स्वातंत्र्य सेनानी ,क्रांतिकारक बंगाली कवी, काझी नजरुल इस्लाम यांचा शनिवार ता. २५ मे २०२४ रोजी १२५ वा जन्मदिन आहे.बंगाली मुस्लिम कुटुंबात २५ मे १८९९ रोजी जन्मलेले काझी नजरूल इस्लाम ढाका येथे २९ ऑगस्ट १९७६ रोजी कालवश झाले. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील बर्दवान जिल्ह्यातील…
-
बुद्ध जयंती निमित्ताने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com गुरुवार ता. २३ मे २०२४ रोजी बुद्ध पौर्णिमा अर्थात गौतम बुद्धांचा जन्मदिन आहे. तीन हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी मांडलेले तत्वज्ञान जगातील प्राचीन तत्वज्ञानांपैकी एक महत्त्वाचे तत्त्वज्ञान आहे. बुद्धानी माणसाची दुःखापासून मुक्ती व्हावी यासाठी जे चिंतन, मनन, संवाद केला ते म्हणजेच बुद्धाचे तत्वज्ञान. राजपुत्र गौतमाने…
-
बर्टोल्ड रसेल यांचा सामाजिक नवनिर्माणाचा विचार

१८ मे हा विसाव्या शतकातील थोर तत्त्वज्ञ बर्टोल्ड रसेल यांचा जन्मदिन. या निमित्ताने त्यांच्या सामाजिक नवनिर्माणाच्या विचारांबाबत…. प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com विसाव्या शतकातील नव -वास्तववादाची आग्रही भूमिका मांडणारे एक प्रगल्भ तत्त्वज्ञ म्हणून बर्टोल्ड रसेल यांचे नाव घेतले जाते. १८ मे १८७२ रोजी त्यांचा जन्म झाला आणि हा दीर्घायुषी…
-
डॉ. दाभोळकर हत्या निकालाच्या निमित्ताने….

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यामध्ये हत्या झाली होती.त्या खटल्याचा निकाल अकरा वर्षानंतर शुक्रवार ता.१० मे २०२४ रोजी विशेष न्यायालयाने जाहीर केला. त्यानुसार सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोन आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख…
-
खिळखिळ्या अर्थव्यवस्थेचे आणखी एक उदाहरण

केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने मंगळवार ता.७ मे २०२४ रोजी एक आकडेवारी जाहीर केली आहे .त्यानुसार भारतामध्ये गेल्या तीन वर्षात कौटुंबिक बचतीत नऊ लाख कोटी रुपयांची घट झालेली आहे. त्याचबरोबर कुटुबांच्या कर्ज आणि उसनवारी घेण्यातही मोठी वाढ झालेली आहे.बचतीचा वेग मंदावणे आणि कर्ज व उसनवारीत वाढ होणे हे ढासळत्या अर्थव्यवस्थेचे लक्षण आहे हे…
-
जीबी ‘ संपवण्यालाच ‘ बिझी ‘ म्हणणे शहाणपणाचे नाही

आधुनिकीकरणाच्या नव्या संकल्पनेत करोडो लोकांचा ‘ स्क्रीन टाईम ‘ मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. तसेच सतत व्यस्त असल्याच्या,कामाचा ताण असल्याच्या,दमून जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. मात्र या तक्रारीना आपण स्वतः जबाबदार किती ? याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘डेटा दीड जीबी आणि सारा गाव बीझी ‘ही नवी म्हण आता समाज जीवनात रूढ…
-
समाजवादी प्रबोधिनीचे ४८ व्या वर्षात पदार्पण

महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळख असणाऱ्या वस्त्रनगरी इचलकरंजी मध्ये‘वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद घेऊन ११ मे १९७७ रोजी समाजवादी प्रबोधिनीची स्थापना झाली. या महिन्यात प्रबोधिनीने ४८ व्या वर्षात पदार्पण करून सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू केली आहे.महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही ख्यातनाम असलेल्या समाजवादी प्रबोधिनीची स्थापना थोर स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ विचारवंत आचार्य शांताराम गरुड यांच्या…
-
बेरोजगारीचे भयावह वास्तव

महाराष्ट्रातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई,चालक ,पोलीस बँडसमन ,एसआरपीएफ, तुरुंग शिपाई ,आदी पदांच्या करता एकूण १७,४७१ जागांची भरती होणार आहे .त्यासाठी राज्यातील १७ लाख ७६ हजार बेरोजगार तरुणांनी अर्ज केलेले आहेत.हे अर्ज करणाऱ्यात ४१ टक्क्यांहून अधिक उच्चशिक्षित आहेत.त्यामध्ये अगदी एमबीए , बिटेक, अभियंता ,डॉक्टर आदी पदव्या मिळालेले सुद्धा आहेत. याचाच अर्थ एका जागेसाठी १०२ उमेदवारांची परीक्षा…
-
प्रचाराचे शास्त्र

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com सध्याचे युग हे ‘ प्रचारी युग ‘ आहे .कारण प्रचाराचे शास्त्र नवनवीन वळण घेत आहे. आचार – विचारापेक्षा आजकाल प्रचाराला फार महत्त्व आलेले आहे .आपले विचार इतरांनी स्वीकारावे, ते त्यांच्या मनावर बिंबावेत यासाठी पुन्हा पुन्हा सांगणे गरजेचे असते. वारंवार केल्या जाणाऱ्या या जाणीवपूर्वक क्रियेलाच…