-
बासष्ठावा महाराष्ट्र दिन
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) रविवार ता.१ मे २०२२रोजी बासष्ठावा महाराष्ट्र दिन आहे. गेली दोन वर्षे या दिनाला कोरोना विषाणूच्या हाहाकाराची एक विषारी,विखारी व जीवघेणी किनार होती. कोणतीही संकटे काही काळ वेदनादायी होत धुमाकूळ घालतात हे खरं .पण ते सारे कालांतराने ओसरते हे ही सार्वकालिक सत्य आहे.अर्थात ते आपली किंमत वसूल करूनच जाते.कोरोनाने…
-
समान नागरी कायदा हवाच
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) भोपाळ येथे भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहमंत्री मा.अमित शहा यांनी २२ एप्रिल २०२२ रोजी केंद्र सरकारकडून समान नागरी कायदा आणण्याची तयारी सुरु असल्याचे सुतोवाच केले. ते म्हणाले समान नागरी कायद्याची अंमलबजावणी उत्तराखंडमध्ये सर्वप्रथम केली जाईल. तेथे कायदा लागू केल्यानंतर परिस्थितीचे आकलन केले जाईल. आणि त्यानंतरच देशात हा…
-
नितीन : तू अमर आहेस
२२/०४/ २०२२ ——————- नितीनला जाऊन उद्या एक वर्ष होतय.त्याचं अकाली जाणं आपल्या सर्वांसाठीच धक्कादायक होत,आहे आणि राहील.सायली वहिनी मला म्हणाल्या, तुम्ही यांच्या लहानपणा पासून फ़ार जवळ होतात.तुमच नात किती घट्ट होत हे मला माहित आहे.कारण हे एक दिवसासाठी जरी मुंबईहुन इचलकरंजीला आले तरी तुम्हाला भेटल्याशिवाय कधीही राहिले नाहीत. इचलकरंजी दौऱ्याच्या प्लॅनिंगमध्ये तुमच्यासाठीचा वेळ कायम राखीव…
-
उपेक्षित महात्मा: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) ” महर्षी विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे हे एक झाकलेल माणिक! अण्णासाहेबांच जीवन म्हणजे सातत्याने धगधगत राहिलेल यज्ञकुंडच.अण्णासाहेबांनी संपूर्ण जीवनभर कणाकणाने जळत राहून आपल्या आयुष्याच्या यज्ञकुंडातला वन्ही सतत प्रज्वलित ठेवला.विसाव्या शतकातील समाज परिवर्तनाच्या चळवळचा मागोवा घेतल्यास महाराष्ट्राच्या सामाजिक ,सांस्कृतिक व राजकीय जीवनावर जबरदस्त प्रभाव टाकणाऱ्या अण्णासाहेबांच्या वाट्याला…
-
महागाईचा आगडोंब आणि राष्ट्रीय कर्जाचा विळखा
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) इंधन दरवाढीने एकशेवीसची पातळी गाठली आहे आणि ती वाढतेच आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या काळात तब्बल चार महिने इंधनाचे दर स्थिर होते. अर्थात तेल कंपन्यांना इंधन दर न वाढविण्याच्या सूचना केंद्रीय सत्ताधाऱ्यांनी दिल्या होत्या. यात शंका नाही नाही. एरवी ‘ इंधन दर वाढीवर आमचे नियंत्रण नाही’ असे म्हणणारे…
-
माणगाव परिषद आणि डॉ.आंबेडकर
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा १३१ वा जन्मदिन आहे. बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या घटनांपैकी माणगाव परिषद एक महत्त्वाची घटना आहे.एकशे दोन वर्षांपूर्वी २१ व २२ मार्च १९२० रोजी कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे अखिल महाराष्ट्र अस्पृश्य वर्गाची परिषद झाली. त्या परिषदेचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते .तर प्रमुख…
-
फुले -आंबेडकरांचा जाती-अंत विचार
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) महात्मा ज्योतिबा फुले यांचा ११ एप्रिल तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल हा जन्मदिन. महात्मा फुले यांना डॉ.आंबेडकर आपले गुरु मानत होते. महात्मा फुले १८२३ साली जन्मले तर डॉ.आंबेडकर १८८९ साली. त्यांच्यात तब्बल ६६ वर्षांचे अंतर होते. फुले कालवश झाले तेव्हा बाबासाहेब तीन वर्षाचे होते.…
-
महान चित्रकार पाब्लो पिकासो

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) ८ एप्रिल २०२२ रोजी महान चित्रकार ,शिल्पकार पाब्लो पिकासो यांचे पन्नासाव स्मृतीवर्ष सुरू होत आहे. पाब्लो पिकासो हे विसाव्या शतकातील महान चित्रकार होत. ” चित्र रंगवणे म्हणजे एखाद्याच आत्मचरित्र लिहिण्यासारखं होय ” असं म्हणणारा हा महान चित्रकार एका अफलातून व्यक्तिमत्व होत.२५ ऑक्टोबर १८८१ रोजी स्पेन मधील…
-
मीनाकुमारीच्या पन्नासाव्या स्मृतीदिनानिमित्त

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) हिंदी चित्रपट सृष्टीतील अतिशय सात्विक व शालीन सोंदर्य असलेली व अभिनयाची असामान्य प्रतिभा असलेली अभिनेत्री म्हणून मीनाकुमारी यांनी आपला ठसा उमटवला आहे.१ ऑगस्ट१९३३ रोजी मुंबईत जन्मलेल्या मीनाकुमारी यांना अवघ्या एकोणचाळीस वर्षाचं आयुष्य लाभलं.अर्थात काहींनी त्यांच जन्मसाल असही लिहिलंय.३१ मार्च १९७२ रोजी त्या मुंबईतच कालवश झाल्या. त्यांचे उर्दू…
-
‘ काळ ‘ चा २२५ वा वर्धापनदिन

धार्मिक ,ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक व वाङ्मयीन विषयांची नि:पक्षपातीपणे व निर्भयपणे चिकित्सा करण्यासाठी ‘ काळ ‘हे राष्ट्रवादी विचारप्रणालीचे साप्ताहिक आपण सुरू केले.’ लोकात दृढमूल व रुढ झालेल्या कित्येक राजकीय कल्पनांच्या उच्छेदानासाठी काळचा जन्म झाला आहे ‘हे उद्दिष्ट जाहीर करून २५ मार्च १८९८ रोजी शिवराम महादेव परांजपे यांनी ‘काळ.हे वर्तमानपत्र सुरू केले. त्याचा आज २२५ वा वर्धापनदिन…